Breaking News

जिल्हा रिपाईचे अध्यक्ष दिपक गायकवाड आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांने सन्मानीत


कोपरगांव / श. प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषदेचे मा. सदस्य व अहमदनगर जिल्हा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नागपुर येथील आंबेडकर दिक्षा भवन येथे प्रदान करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री दिलीप कांबळे, मा. मंत्री सुरेखा कुंभारे, सुनिता गायकवाड यांच्यासह राज्यभरातील मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले म्हणांले की, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील आंबेडकरी जनतेला सुसंस्कृत करण्यांसाठी जे कष्ट घेतले, त्याची आठवण समाजातील कार्यकर्त्यांनी ठेवून, त्याप्रमाणे सामाजिक कार्यात योगदान देणार्‍या व्यक्तींचा हा गौरव आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक गायकवाड सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, मा. मंत्री शंकरराव कोल्हे व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळे आपण घडलो, हा त्यांचाच सन्मान असून तो कार्यकर्त्यांना अर्पण करीत आहे. 2017-18 या काळातील हा पुरस्कार असून राज्यभरातील 61 कार्यकर्ते व 6 संस्थांना देण्यांत आले. सत्काराबद्दल त्यांचे आ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, रिपाई जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, माजी सभापती शिवाजी वक्ते, मच्छिंद्र केकाण, मच्छिंद्र टेके, सुनिल देवकर, माजी गटनेते केशव भवर, कोपरगांव तालुका रिपाईचे अध्यक्ष जितेंद्र रणशुर, प्रकाश कोपरे आदिंनी अभिनंदन करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.