Breaking News

एकाच कुटूंबातल्या पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

अलिबाग : तालुक्यातील आक्षी या गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली. पाचही जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अलिबागमधील जिनल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रामचंद्र पाटील त्यांची पत्नी रंजना पाटील सून कविता पाटील आणि स्वराज पाटील व स्वराली पाटील अशी त्यांची नावे आहेत. या पाचही जणांना अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यापैकी स्वराज याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांला मुंबई येथे हलवण्यात येत आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली . या सर्वांनी शीतपेयातून विष घेतले आहे. त्यामुळे त्यांना उलटया सुरू झाल्या. दोन लहान मुले रडू लागली तेव्हा शेजारच्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी या सर्वांना रूग्णालयात दाखल केले. रामचंद्र पाटील हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात तर त्यांचा मुलगा मुलगा राहुल हा रबाळे येथे नोकरीनिमित्त रहात असतो अशी माहिती मिळाली आहे .