Breaking News

अरुणाचलमध्ये दरड कोसळून चार जवानांचा मृत्यू अमरनाथ यात्रेवरही पावसाचा परिणाम


नवी दिल्ली : देशात पावसाचा जोर वाढत आहे. मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशात भारताच्या सीमेवर चार जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंनाही पावसाचा सामना करावा लागत आहे. देशाच्या अन्य भागांतही मुसळधार पावसाचे वृत्त समोर येत आहेत. पाऊस ठरलेल्या वेळेच्या दोन आठवडे अगोदरच सुरू झाला असून देशाच्या अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशात दरड कोसळून चार सीमा सुरक्षा दलाचा मृत्यू झाला आहे.
अरुणाचल प्रदेश - अरुणाचल प्रदेशातील सिआंग जिल्ह्यातील बसर-अकाजन मार्गावर पावसामुळे कोसळलेल्या पहाडाचा तुकडा सीमा पोलिसांच्या गाडीवर कोसळल्याने जवानांचा मृत्यू झाला. पोलिसांने दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली.