Breaking News

अन्यथा मुंबईचे दूध बंद करणार खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा


पुणे : दूध दरवाढीसंदर्भात खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. सरकारने दूध उत्पादकांच्या खात्यात प्रतिलिटर पाच रुपये जमा करावे. अन्यथा पंधरा तारखेपासून मुंबईचे दूध बंद करू, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, की आता शेतकर्‍यांची सहनशीलता संपली आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला हवे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या खात्यात प्रतिलिटर पाच रुपये जमा करावे.,अन्यथा मुंबईेचे दूध पंधरा जुलैपासून बंद केले जाईल. जलशिवारसंदर्भात या सरकारने केवळ गवगवा केला. पण पावसाळ्यात जलशिवाराची कामे दुर्बिण घेऊन शोधावी लागतील, असा टोलाही राजु शेट्टी यांनी सरकारला लगावला आहे.