Breaking News

पहिल्या पावसाने सर्वांची तारांबळ


कोपरगाव शहर प्रतिनिधी : शहरात अनेक दिवसांपासून जाणवत असलेला उकाडा आज {दि. ८} झालेल्या जोरदार पावसाने कमी होईल, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. आज झालेल्या पहिल्याच पावसाने नागरिक व दुकानदारांची तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून बंदिस्त गटारे उघडलेली नसल्याने रस्त्यावरचे पाणी गटारात न जाता रस्त्यांवर साचले. विघ्नेश्वर चौक, बस स्टॅन्ड परिसराला नदीचे स्वरूप आले होते. या परिसरातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानदारांनी नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.