मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शुक्रवारची ही घटना आहे. दत्तात्रय गुंड असं या 32 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव आहे. तरुण अडत व्यापार्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्यावर्षी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला 800 क्विंटल हरभरा पडून असल्याचंही दत्तात्रय गुंड यांनी म्हटलं आहे.