अहमदनगर महाविद्यालयाचा 12 वीचा 90 टक्के निकाल
अनुभवी शिक्षकांचे प्रभावी अध्यापन तसेच शिस्तबद्ध दैनंदिन अध्यापन व प्रोत्साहन वर्ग याचा विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मोठा वाटाआहे. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम यामध्ये दर पाच दिवसानंतर होणारी युनिट टेस्ट, इ-लर्नींग, डीजीटलक्लास रुम, गरजु विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारे रेमेडीयल तास, सर्व परिक्षांचे गुण एस.एम.एस व्दारे पालकांना कळविणे, सर्व परिक्षांच्याउत्तरपत्रिका पालकांना दाखविणे तसेच विद्यार्थ्यांकडे देण्यात येणारे वैयक्तिक लक्ष या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये मोठाहातभार लागत आहे.
यापुढील काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालय यापेक्षाही अधिक चांगली प्रगती करेल असा विश्वास प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, उपप्राचार्यप्रा.विनीत गायकवाड, व पर्यवेक्षक प्रा.शकील सर यांनी व्यक्त केला.