Breaking News

शेतकरी संपामुळे नाशिक जिल्ह्यात शेतमालाची आवक घसरली.

नाशिक, दि. 03, जून - राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिकसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी येणा-या शेतमालाची आवक दुस-या दिवशीही फारच कमी होती. 


या संपाचा परिणाम म्हणून शनिवारी दुपारी बाजारसमितीत शुक्रवारपेक्षा 15 ते 20 टक्के मालाची आवक वाढली होती.कमी आवक असल्याने भाजीपाला दर तेजी होते. तर याचा मोठा फटका मुंबई आणि उपनगर भागाला मोठ्या प्रमणात जाणवणार आहे.