Breaking News

डीजीएमओ स्थरावर चर्चा व्हावी : मेहबुबा मुफ्ती

जम्मू भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेले शस्त्रसंधीचे उल्लंघन ‘दुर्दैवी’ आहे. सीमेवरील रक्तपात थांबविण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने पुन्हा डीजीएमओ स्थरावर चर्चा करावी, असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी, शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारत आणि पाकिस्तान सीमेच्या दोन्ही बाजूला मृत्यूमुखी पडणार्‍या नाग रिकांप्रती मेहबुबा यांनी चिंता व्यक्त केली. तसेच रक्तपात कायमचा थांबवायला हवा, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.