Breaking News

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकच्या गोळीबारात 2 जवान शहीद


श्रीनगर - पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केल्याने सीमा सुरक्षा दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत. ही घटना जम्मू व काश्मीर जिल्ह्यातील अखनूर येथे घडली आहे. पाकिस्तान लष्कराने नुकतेच शस्त्रसंधीचे पालन करू हे दिलेले आश्‍वासन न पाळता शस्त्रसंधीचा भंग केला आहे.रमजानच्या पवित्र महिन्यात भारतीय सैन्यदलाने दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिम थांबविली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्यदल शस्त्रसंधीचा सातत्याने भंग करत असल्याच्या घटना घडत आहेत. 
सीमा सुरक्षा दलाचे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूर सेक्टरमधील सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांवर गोळीबार क रण्यात आला. या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. अखनूर सेक्टरमधील प्रगवाल भागात पाककडून गोळीबार करण्यात आला. सीमा सुरक्षा दला कडूनही पाकि स्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. उपनिरीक्षक दर्जाचे हे दोन्ही जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. कुमार पांडे आणि सत्यनारायण यादव अशी या जवानांची नावे आहेत. पाकिस्तानकडून सीमा सुरक्षा दलाकडे गोळीबार न करण्याची विनंती केल्यानंतर पाककडून पुन्हा एकदा गोळीबार क रण्यात आला आहे. रमजान महिन्यात भारत सरकारने सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही पाकिस्तानकडून आगळीक सुरुच आहे. पाककडून यापूर्वीही सीमेवरील गावांवर गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.