Breaking News

जालना-औरंगाबाद महामार्गावर कार भीषण अपघातात 4 जण ठार


औरंगाबाद - जालना-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या कार अपघातात 4 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातातील सर्व मृत हे शहरातील बायजीपुरा येथील असून, ते साखरपुड्यासाठी परभणीला जात होते. मृतांमध्ये ज्याचे लग्न ठरले होते त्याचाही समावेश आहे. सटाणा फाट्याजवळ सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमाधील सर्वजण साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी परभणीला जात होते, त्यावेळी कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये ज्याचे लग्न ठरले होते त्याचा आणि दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा समावेश आहे.
करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद-जालना महामार्गावर सटाणा फाट्यापासून काही अंतरावर भरधाव वेगाने जाणार्‍या कारवरील ( क्र. एम. एच. 04 डीई 8735) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेच्या नाल्यात जाऊन पलटी झाली आणि जवळच असणार्‍या सिमेंटच्या पोलला घडकली. ही धडक एवढी भीषण होत की, कार पूर्ण चक्काचूर झाली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. करमाड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.