Breaking News

हत्येचा आरोप असलेल्याकडे भाजपचे नेतृत्व : राहुल गांधी

बंगळुरू : प्रामाणिकपणा आणि शालिनता याबद्दल बोलणार्‍या पक्षाचा अध्यक्ष हत्येप्रकरणातील आरोपी आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली. शाह यांच्यामध्ये विश्‍वसनीयता नसल्याचा दावाही त्यांनी केला. राहुल गांधी पुढे म्हणाले, अमित शाह यांच्यावर हत्या प्रकरणाचा खटला आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती लोया प्रकरणाचा उल्लेख केला आहे.