Breaking News

कपडे हे बलात्कारामागील कारण नाही : सीतारामन

नवी दिल्ली : बलात्काराचे मुख्य कारण पोशाख आहे, असे म्हणणे मुर्खपणाचे आहे. कपडे हेच जर बलात्काराचे कारण असेल, तर म्हातार्‍या महिला आणि लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना का घडतात? असा प्रश्‍न विचारत, मुळात विचार बदलण्याची आवश्यकता आहे, असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. फिक्कीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सीतारमण यांनी महिलांविरुद्ध वाढते गुन्हे आणि कपड्यांच्या विषयावर नागरिकांशी संवाद साधत अनेक प्रश्‍न विचारले. क ायदाविषयक संघटनांनी महिलांना अधिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत, असे त्या म्हणाल्या.