Breaking News

शिवसेनेच्या ’हिंदू शक्ती’ मोर्चास परवानगी नाकारली


औरंगाबाद - शहरात उलळलेल्या दंगलीनंतर शिवसेनेच्या वतीने काढण्यात येणार्‍या ’हिंदू शक्ती’ मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकरली आहे. दंगलीनंतर केवळ शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक केली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून शनिवारी शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. शहरात 12 मे च्या रात्री 2 गटात भीषण दंगल झाली होती. या दंगलीनंतर पोलिसांनी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि लच्छु पैलवान यांना अटक केली होती. तर ‘एमआयएम’च्या फरार झालेल्या फेरोज खान यालाही नंतर अटक केली. या अटकसत्रानंतर शिवसेनेने मात्र, पोलीस फक्त आपल्याच कार्यकर्त्याला अटक करत आहेत, असा आरोप केला होता. आणि पोलिसांच्या या कृत्यविराधात मोर्चा काढण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता. हा मोर्चा उद्या (शनिवारी) काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला एक दिवस शिल्लक असतानाच परवानगी नाकारली आहे.