आत्महत्येचे पुरावे दडवून शासन तो एक अपघात आहे, असे भासविण्याचा खटाटोप करण्यातच मश्गुल
खून करून पुरावे दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंद्राणी मुखर्जी, अभय कुरुंदकर, युवराज कामटे आणि आत्महत्येचे पुरावे दडपणाऱ्या या सरकारमध्ये काहीही फरक नाही. मुखर्जी, कुरुंदकर, कामटे आणि हे सरकार एकाच माळेचे मणी आहेत, असा प्रहारही त्यांनी केला.
जिल्ह्यातील सावळेश्वरचे शेतकरी माधव रावते, राजूरवाडीचे शंकर चायरे आणि टिटवीचे प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. ते म्हणाले, या सरकारने सावळेश्वर येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी परिसीमा गाठली आहे. कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्याने झालेल्या शेतकरी आत्महत्या एकप्रकारे सरकारने केलेल्या हत्याच आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे असंवेदनशील आणि कोडगे सरकार कधीही झाले नव्हते. त्यामुळे या शासनावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली