पाणी योजनेसंदर्भात १८ ला बैठक
कोेपरगांव : शहरातील रस्ते वीज पाणी व नागरी सुविधांसंदर्भात तसेच निळवंडे धरणांतून शिर्डी-कोपरगांवपर्यंत पिण्यासाठी आणावयाच्या पाणीयोजनेसंदर्भात कृष्णाई मंगल कार्यालयात शुक्रवारी {दि. १८ } आ. स्नेहलता कोल्हे यांनी बैठक आयोजित केली आहे.
त्यासाठी शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, वकील, डाॅक्टर्स, इंजिनियर, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आदींनी मोठया संख्येने या बैठकीस उपस्थित राहून आपले विचार व्यक्त करावेत, असे आवाहन त्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.