वृक्षसंवर्धनाबाबत उदासिनता चिंताजनक : तांबे
सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत शहरात २५ उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे.
यावेळी बोलतांना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, सुजाण नागरिकांनी वृक्षांबाबत अधिक जागरुक व्हावे. त्यांचे संवर्धन करावे. कोणी जर वृक्षांची नासधूस करीत असेल तर त्यास प्रतिकार करावा. घराजवळील परस बागेत, घरांच्या व दुकानांच्या आसपास असलेल्या वृक्षांना पाणी टाकावे.
हरित वनराईसाठी नुकसानकारक
स्वच्छ व हरीत संगमनेर शहरासाठी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून सर्व रस्त्यांच्या दुतर्फा हजारो वृक्ष लावण्यात आले आहेत. मात्र या वृक्षांच्या संवर्धनाबाबत शहरातील नागरिकांकडून दिसणारी उदासिनता चिंताजनक बनत चालली आहे. स्वच्छ हवा, प्रदूषण मुक्तता आणि हरित वनराईसाठी नक्कीच हे नुकसानकारक आहे. - प्रा. बाबा खरात