Breaking News

मुलगा दहावीत नापास; कुटुंबाने काढली मिरवणूक


मध्य प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल साेमवारी जाहीर झाला. त्यात माेठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले अाहेत. बुंदेलखंडमधील खजुराहाे येथे एका मुलाने परीक्षेत नापास झाल्याने अात्महत्या केल्याची घटना घडली. मात्र, सागर येथे एका कुटुंबाने मुलगा दहावीत नापास झाल्याने चक्क मिरवणूक काढून जल्लाेष साजरा केला. तसेच अातषबाजी करून मिठाईदेखील वाटली. 

सरस्वती शिशुमंदिरात (शिवाजी वाॅर्ड) शिकणारा इयत्ता दहावीचा विद्यार्थी अाशू व्यास हा सहापैकी ४ विषयांत नापास झाला. त्यावर नाराज वा संतप्त न हाेत्या अाशूचे वडील सुरेंद्रकुमार व्यास यांनी निकालाच्या दिवशीच संध्याकाळी परिसरातून अाशूची वाजतगाजत मिरवणूक काढली.