राष्ट्रवादीच्या बदनामीचं षडयंत्र : अजित पवार
अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. हे राष्ट्रवादीची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार बोलत होते. मात्र या आरोपांमधून राष्ट्रवादीची बदनामी सुरु असल्याचे अजित पवारांनी सांगितले. ते म्हणाले की, या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण आहे तो शोधून काढा, ती जबाबादारी पोलिसांची आहे. फोन तपासा, कुठे सुई जाते ते तपासा. या सगळ्या तपासात संग्रामचा कुठेही यत्किंचितही संबंध नाही, हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अशाप्रकारचा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीचा आमदार म्हणून बदनामी करण्याचे काम चाललेले आहे. संशयाच्या भोवर्यामध्ये त्यांना अडकवण्याचं काम सुरु आहे.