अहमदनगर ;- वर्का चॅरिटेबल ट्रस्टच्या वर्का स्कूल अॅण्ड ज्युनियर काॅलेज अरणगाव येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उतसाहत संपन्न झाला.."बारावीची परीक्षा ही महत्त्वाची असते कारण ती आपल्याला आयुष्यातयोग्य दिशा ठरवण्यास मदत करते, तरीही या परिक्षेस जागरूकपणे सामोरे जाणे जास्त गरजेचे असते." अशा शब्दांत प्राचार्य डाॅ रामिन एच्. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांनी आणि क्रिडास्पर्धेने उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले. वर्का महाविद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ मुशर्रफ मुलानी, शिक्षिका सौ मुबिना शेख, तसेच फिनिक्स अकॅडमी च्या प्राचार्या सौ मिताली बाजपेयी यावेळी उपस्थित होत्या.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्साहात निरोप
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:15
Rating: 5