Breaking News

मुंबईमधून 11 बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबई : मुंबईमध्ये अवैध वास्तव्यास असलेल्या अकरा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केली असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील कांदिवलीमधून तीन जणांना अटक केली आहे.तर, मालवणीतून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, बांगलादेशने बंदी घातलेल्या अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना भविष्यात महाराष्ट्रासह भारतासाठी धोका ठरू शकते, या दृष्टीने सुरक्षा यंत्रणांनी बांगलादेशींची धरपकड सुरू केली आहे. पुणे, महाड, अंबरनाथ, पनवेल येथील कारवाईनंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाने गेल्या आठवड्यात सुद्धा कांदिवली येथून आठ बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे.