नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 41 व्या ‘मन की बात’ मध्ये देशाला संबोधित करतांना, गोबरपासून बायोगॅस आणि जैविक खत बनविण्याचे आवाहन शेतक़र्यांना केले. हे कमाईचे नवे साधन आहे. शेतक़र्यांना याचा चांगला मोबदला मिळेल. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आपल्याकडे बुद्धयान, भास्कर, ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट यांच्यासारखे गणितज्ञ आहेत. तर मेडिकल विज्ञानात सुश्रुत आणि चरक सारखे व्यक्ती असणे आपल्यासाठी गर्वाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. डॉ. सीवी रमन यांच्या जन्मदिनी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्या दिल्या असून, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात महिलांना समान भागीदारी मिळणे ही आपली जबाबदारी असल्याचे जाहिर केले आहे. तसेच ‘गोबरधन’ योजनेसाठी ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोबर’ हे कमाईचे साधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’मध्ये सल्ला
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:18
Rating: 5