राज्यात वाढती वाहतूक आणि परवडणारी घरे या दोन समस्या आहेत. यावर उपाय करण्यासाठी राज्याने आश्वासक पाऊले उचलली आहेत, असे श्री. मदान यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील इतर वाहतूकपर्यांयांबाबत सादरीकरण केले. सबअर्बन रेल्वे, मेट्रो आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यायी वाहतूक मार्ग निर्माण होत आहे. विरार ते अलिबाग असा मल्टी मोडल कॉरिडॉर तयार होणार आहे, याबाबतची कार्यवाही सुरूझाली आहे. यासोबतच बीकेसी ते विमानतळ हे अंतर केवळ दहा मिनीटात पोहचण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. सुमारे 1 लाख 73 कोटीची कामे सुरू असून येत्या पाच वर्षात ती पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
पायाभूत सुविधांमधून राज्याची प्रगती
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:44
Rating: 5