Breaking News

इंटरनेट नवलेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ : डॉ. चवरे


कोल्हार : प्रतिनिधी :- इंटरनेटमुळे वेगवेगळ्या प्रांतीय भाषामधील दुरावा राहिलेला नाही. कोणत्याही भाषेचा लेखक इंटरनेटमुळे स्वतःला अभिव्यक्त करू लागला आहे. एकवेळ अशी होती, ज्यावळेस इंटरनेट म्हटले, की फक्त इंग्रजीचेच तिथे वर्चस्व होते. पण सध्या हिंदी, मराठी, तेलुगु, कन्नड आणि अशा अनेक भाषांचे साहित्य इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन युवा लेखक मनसोक्त लिहू लागला आहे. आधुनिक युगात इंटरनेटरुपी साधन या नवलेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे, असे प्रतिपादन सातारा येथील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी चवरे यांनी केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि कोल्हार येथील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विषयाच्या ‘आंतरजालीय हिंदी साहित्य : स्वरूप व संभावनाएँ’ तर रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने ‘फिजीको केमिकल एप्लिकेशन ऑफ ज्ञानोटेक्नोलॉजी’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात बोलत होते. ते म्हणाले, आज लेखक साहित्यातील पारंपरिक बंधन तोडून लिहित आहेत. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. आज कोणतीही भाषा कुठल्याही विशिष्ट वर्गाच्या वाचकवर्गासाठी मर्यादित राहिलेली नाही. खऱ्या अर्थाने आतापर्यंत दबलेल्या आवाजाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य इंटरनेटमुळे मिळाले आहे.