जव्हार तालुक्यातील तीन पाडे आठवड्यापासून अंधारातच
पालघर, दि. 21, फेब्रुवारी - जव्हार तालुक्यातील देहेरदेवगाव-उक्शिपाडा येथील विद्युत वाहिनीचे कोसळले असल्याने येथील तीन पाडे गेल्या आठवड्यापासून अंधारातच आहेत. ऐन परीक्षेच्या काळात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी वर्गाचेही मोठ्या प्रमाणत हाल होत आहेत.
मागील आठवड्यात झालेल्या वादळी वार्यामुळे देवगाव- उक्शिपाडा येथील पाच विद्युत लोखंडी पोल कोसळले गेले. त्यामुळे देहेरे ग्रामपंचायत हद्दीतील उक्शिपाडा, देवगाव, नवापाडा या तीन पाड्यांवर अंधार पसरला आहे. याबाबत जव्हारच्या विद्युत मंडळाला कळवूनही दुरुस्ती करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. विद्युत खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करावा अशी मागणी येथील संतप्त नागरीकामधून वारंवार केली जात आहे.
मागील आठवड्यात झालेल्या वादळी वार्यामुळे देवगाव- उक्शिपाडा येथील पाच विद्युत लोखंडी पोल कोसळले गेले. त्यामुळे देहेरे ग्रामपंचायत हद्दीतील उक्शिपाडा, देवगाव, नवापाडा या तीन पाड्यांवर अंधार पसरला आहे. याबाबत जव्हारच्या विद्युत मंडळाला कळवूनही दुरुस्ती करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. विद्युत खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करावा अशी मागणी येथील संतप्त नागरीकामधून वारंवार केली जात आहे.