उक्कलगावात आजपासून भरणार आठवडे बाजार
उक्कलगांव प्रतिनिधी ;- श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरानदीच्या काठावरील असलेले उक्कलगांव, बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द या तीन गावांत उद्यापासून {दि.२१} आठवडे बाजार भरणार आहे. हरिहर केशव गोविंद महाराजच्या पावन नगरीत या आठवडे बाजाराला सुरुवात होणार असल्याने उक्कलगाव परिसरात आंनदाचे वातावरणात आहे. या गावांपासून श्रीरामपूरची बाजारपेठ १० किलोमीटरच्या अंतरावर आहे.
कोल्हाराची बाजारपेठदेखील येथून १० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामध्ये बेलापूर ३ किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी आठवडेबाजारअभावी स्थानिक ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. मात्र ही गैरसोय आता कमी होणार आहे. शेतक-यांचा शेतमाल गावात विकला जाणार आहे. या मालाला योग्य भाव मिळेल.
उक्कलगावची लोकसंख्या ८ हजार आहे. या गावात यापूर्वी एकदा बाजार भरण्यात आला होता. मात्र या बाजाराकडे विशेष असे लक्ष देण्यात आले नव्हते. आता पहिल्यांदा जनतेतून संरपच निवड झाली असून नूतन सरपंचांनी घेतलेल्या या निर्णयाला आज महत्व आले आहे.
कोल्हाराची बाजारपेठदेखील येथून १० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामध्ये बेलापूर ३ किलोमीटर अंतरावर आहे. परिणामी आठवडेबाजारअभावी स्थानिक ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. मात्र ही गैरसोय आता कमी होणार आहे. शेतक-यांचा शेतमाल गावात विकला जाणार आहे. या मालाला योग्य भाव मिळेल.
उक्कलगावची लोकसंख्या ८ हजार आहे. या गावात यापूर्वी एकदा बाजार भरण्यात आला होता. मात्र या बाजाराकडे विशेष असे लक्ष देण्यात आले नव्हते. आता पहिल्यांदा जनतेतून संरपच निवड झाली असून नूतन सरपंचांनी घेतलेल्या या निर्णयाला आज महत्व आले आहे.