छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी सामर्थ्यांची दृष्टी अजोड सागरी सामर्थ्य प्रथम शिवरायांनीच ओळखले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्यांची दृष्टी अजोड असल्याचे कौतुकोद्गार देखील पंतप्रधान यांनी काढले. त्याचबरोबर वेळेत कामं पूर्ण होणारी नवी संस्कृती आता रुजू होत असल्याचं सांगत, त्यांनी भाजप सरकारच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. दरम्यान, या क्रार्यक्रमावर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मात्र बहिष्कार टाकला.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या उपस्थितीत करण्यात आले.