Breaking News

मुस्लिमांनी भारतात राहू नये भाजप खा. विनय कटियार यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : भाजप खासदारांचे वादग्रस्त वक्तव्य काही थांबण्याची चिन्हे नसून, मुस्लिमांनी भारतात राहू नये, तर थेट पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावे असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार विनय कटियार यांनी बुधवारी केले. कटियार यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधणार्‍या व्यक्तींना तुरुंगात टाकण्याच्या ओवेसींच्या मागणीला उत्तर देताना कटियार यांनी वाद ओढवून घेतला आहे. ‘मुस्लिमांनी या देशात राहता कामा नये. लोकसंख्येच्या आधारावर त्यांनीच आपल्या देशाचे विभाजन केले. मग त्यांना इथे राहण्याची गरजच काय? त्यांना स्वतंत्र प्रदेश देण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये जावे. त्यांचे इथे काम काय?’ असे विनय कटियार म्हणाले. विनय कटियार हे विश्‍व हिंदू परिषदेची यूथ विंग असलेल्या बजरंग दलाचे संस्थापक आहेत. ‘वंदे मातरम् चा आदर न करणार्‍या, राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍या आणि पाकिस्तानी झेंडा फडकवणार्‍या व्यक्तींना शिक्षा देण्याची तरतूद करावी’ अशी मागणीही कटियार यांनी केली. ’धर्माच्या नावाखाली मुस्लिमांनी देशाची फाळणी केली’ अशी टीकाही विनय कटियार यांनी केली. ‘भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणार्‍यांना तुरुंगात टाका’ भारतीय मुस्लिमांना ‘पाकिस्तानी’ संबोधणार्‍या व्यक्तींना तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याचा कायदा करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी क ाल लोकसभेत केली होती.