Breaking News

अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

पालघर : माहीम-पालघर रोडवर पाटीलवाडी येथे बुधवारी पहाटे 3 वाजता वोक्स वॅगन गाडी नं. एम.एच.48-ए-0696 भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून एका वडाच्या झाडाला जोरात धडक दिल्याने कारमधील पाच तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

या घटनेत मृत पावलेल्यामध्ये निकेश मोहन तामोरे (वय 25 रा तारापूर घिवली), किरण परशुराम पागधरे (वय 30.रा.वडराई), संतोष वामन बहिराम. (वय 37. रा. खाणपाडा), दिपेश रघुनाथ पागधरे (वय 25 रा. सातपाटी), विराज अर्जुन वेताळ (वय.25. गाडी (चालक-मालक) रा.पालघर) या पाच तरुणांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण वडराई येथील आपल्या मित्राच्या हळदी समारंभास गेले होते. समारंभ आटोपून पहाटेच्या 3 ते 3:30 वा.चे सुमारास पालघरच्या दिशेने जात असताना हरणवाडी परिसरातील पाटीलवाडी भागातून जात असताना कार चालक विराजचे नियंत्रण सुटल्याने ती कार रस्त्याच्या कडेला असणार्या एका वडाच्या झाडावर आदळून बाजूच्या खड्यात पडली होती. काही तासांनी या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसाना दिली. त्यानुसार पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाचही तरुणांना तात्काळ पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डा ॅक्टरांनी त्यांची तपासणी करून पाचही तरुण मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणाचा अधिक तपास पालघर पोलीस करीत आहेत.