सिंधुदुर्गात 150 नवीन मोबाईल टॉवर उभारणार - खा. विनायक राऊत
या बैठकीत समितीच्या सदस्या तथा जि. प. माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांनी दूरसंचार सेवेच्या सेवेविषयी तीव्र भावना मांडल्या. दूरसंचारचे लँडलाईन फोन, केबल निकृष्ट यामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे लँडलाईन कनेक्शन बंद करत आहेत, अशी माहिती त्यांनी केली. त्यावर केबल ठेकेदाराला समज देण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या.
राऊत म्हणाले, सिंधुदुर्गात 300 टॉवर अद्ययावत केले जाणार आहेत. येत्या मार्च-एप्रिलपर्यंत 150 टॉवरला नवीन तंत्रज्ञान जोडले जाणार आहे. यामुळे ज्या भागात टॉवर बंद राहील, त्याची माहिती दूरसंचार अधिकाऱयांना तात्काळ मिळणार आहे. कुणकेश्वर, आंगणेवाडी, सोनुर्ली, आंबोली या महत्वाच्या ठिकाणी मोबाईल कव्हरेज वाढवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.