पाणी पुरवठा करण्यासाठी करावे लागतात असाही काही फंडा
आज शहरातील एका विभागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी सोडणार्या काकांना आपली दुचाकी गाडी बॅरिकेटस् म्हणून तीचा वापर करावा लागला. बॅरिकेटस् शहरामध्ये कमी प्रमाणात असल्यामुळे अशा वेळी मनपा कामगारांना कामे करत असताना अशा प्रकारच्या शक्कल लावाव्या लागतात.शहरातील रस्त्यांची रूंदी वाढल्यामुळे कदाचित हे पाणी सोडण्याचे व्हॉल्व्ह रस्त्यांच्या मध्यभागी आले असल्याचे दिसून येत आहे. परंतु यावर मनपाकडून काहीतरी पर्याय शोधणेही तितकेच महत्वाचे आहे.
