Breaking News

जाहीर झालेल्या गोष्टी पूर्ण न करता सरकारची दुसरीच अंमलबजावणी सुरू - अजित पवार


मुंबई, दि. 21, जानेवारी - राज्यात जाहीर झालेल्या गोष्टी पूर्ण न करता दुसरीच अंमलबजावणी करण्यात येत असल्यामुळे हे सरकार बावचळून गेले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लोहाच्या जाहीर सभेत केली. करोडो रुपयांच्या घोषणा करायच्या आणि खिशात एक रुपयाही नाही अशी अवस्था या सरकारची झाली आहे. औरंगाबादमध्ये भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. परंतु तेही स्मारक उभारले गेले नाही. कुठल्याही महामंडळांना सरकार निधी देत नाही. शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा घाट सरकार घालत आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला. महाराष्ट्रातील माणसाला जगण्यासाठी लागणारे किफायतशीर पाणी या सरकारने दयायला हवे होते. परंतु हे सरकार तसे करताना दिसत नाही, असेही अजित पवार म्हणाले.