Breaking News

मेवानी हा खरचं आंबेडकरवादी असेल तर त्याने लाल सलाम न म्हणता जय भीम म्हणावे - रामदास आठवले

पुणे : नक्षलवादाकडे जाणारा नाही तर युध्दाकडून बुध्दाकडे जाणारा खरा आंबेडकरवादी होय. नक्षलवादी होऊन कुठल्याच व्यक्तीचं आजवर भलं झाल नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं. आम्ही त्यांना आरपीआय (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) मध्ये सहभागी करून घेऊ, त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते म्हणाले, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणीने नक्षलवाद्यांच्या नादाला लागू नये. 


मेवानी हा खरचं आंबेडकरवादी असेल तर त्याने लाल सलाम न म्हणता जय भीम म्हणावे. जिग्नेश मेवानी यांना जर खरचं चांगला नेता व्हायचं असेल तर त्यांनी उलट सुलट भाषण करून आंबेडकरवादी तरुणांना भरकटवण्याचे काम करू नये. आमदार जिग्नेश मेवानी यांनी गुजरातमध्ये बोलताना सरकारने प्रत्येक दलितांना पाच एकर जमीन द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, फक्त दलित व्यक्तीलाच नाही तर गावामध्ये वास्तव्य करणार्‍या प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला पाच एकर जमीन द्यावी, अशी मागणी आम्ही खूप वर्षांपूर्वी केली होती. गावातील गरीबी हटवायची असेल आणि शहरात येणारे लोंढे रोखायचे असतील तर फक्त दलित व्यक्तीलाच नाही तर गावामध्ये वास्तव्य करणार्‍या प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला जमीन दिली पाहिजे.