Breaking News

महात्मा फुले कृषि विद्यापीठात अविष्कार स्पर्धा


राहुरी प्रतिनिधी - येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ परिसरात दि.१५ ते दि.१७ या कालावधीत अविष्कार या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेचे करण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन बिहार येथील नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पी. भाटकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा राहतील. 
या स्पर्धेत राज्यातील कृषि व अकृषि असे एकूण २० विद्यापीठांचे ९६० विद्यार्थी विविध संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांबरोबर ४० संघनायक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील संशोधन प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी परराज्यातून ३६ तज्ञ परीवेक्षक बोलविण्यात आलेले आहेत. या संशोधन स्पर्धेमध्ये विविध विभागात विद्यार्थी त्यांचे संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख आदी उपस्थित राहतील.