तपासात कुणाचीही गय करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
डॉ. गवई यांनी भीमा-कोरेगाव घटनेची न्यायालयीन चौकशी आणि या प्रकरणात भीम सैनिकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन त्यांना मुक्त करण्याची मागणीही केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले की, राज्य सरकार या प्रकरणाचा न्यायालयीन तपास करणार आहे. कुठल्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, तसेच समाजातील वातावरण दूषित करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
