मुंबईत एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणारी बोट जप्त
एलईडी लाईटद्वारे करण्यात येणारी मासेमारी ही मत्स्य साठ्यावर अत्यंत घातक परिणाम करणारी आहे. केंद्र शासनाच्या 10नोव्हेंबर 2017 च्या आदेशानुसार एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. एलईडी लाईटच्या प्रकाशामुळे मासेमारी क्षेत्रातील सर्व मासे आकर्षित होऊन एकाच ठिकाणी जमा होतात. हा संपूर्ण साठा एक ाच जाळ्याद्वारे पकडला जातो. त्यामुळे असे साठे संपत गेल्यास भविष्यात माशांचे उत्पादन कमी होऊन मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते.
