Breaking News

उत्तर प्रदेश महापालिका निवडणुकीत भाजपच विजयी.

उत्तर प्रदेशातील लखनौ, वाराणसी ,फिरोझाबाद,कानपूर,मोरादाबाद, गाझियाबाद, मथुरा, आग्रा,अयोध्या ,झाशी,सहारनपूर,बरेली या महत्त्वाच्या महानगरपालिका आता भाजपने काबीज केल्या आहेत.नगर निगम निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये 16 महानगरपालिकांपैकी 14मध्ये भाजपने विजय मिळवला आहे.


या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला एकही महानगरपालिका जिंकत आलेली नाही. तर दुसरीकडे राहुल गांधींचा खासदारकी क्षेत्र असलेल्या अमेठी नगर पंचायतच्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश संपादन केलं आहे.