Breaking News

महाराष्ट्राला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनाचे तीन पुरस्कार


महाराष्ट्रातील चंद्रपूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील ऊर्जा प्रकल्पांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा दक्षता ब्युरोच्या वतीने ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’ चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. यावेळी ऊर्जा संवर्धन पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री राकेश सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.