Breaking News

गणेश भूतकर हत्याप्रकरणी तिघांना केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी


अहमदनगर प्रतिनिधी - शनिशिंगणापूर येथील गणेश भूतकर हत्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना नाशिक जिल्ह्यातील येवला नाका येथे अटक केली. यामध्ये अविनाश चांगदेव बानकर, मयूर बाळासाहेब हरकळ आणि अर्जुन सुरेश महाले यांचा समावेश आहे. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.