गुजरातेत भाजपा सत्तेवर येणार नाही.
काकडे म्हणाले, २५ वर्षांपेक्षा अधिक काळ कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता राज्यांत टिकलेली नाही. ॲन्टी इंकम्बन्सी फॅक्टरमुळे भाजपा यावेळी गुजरातमध्ये सत्तेत येणार नाही. पटेल समाज प्रथमच भाजपच्या विरोधात गेला आहे. कॉँग्रेसने त्यांना एकत्र केले. भाजपाने ज्या प्रमाणात विकासाचे मुद्दे गुजरात निवडणुकीत मांडायला हवे होते, तसे मांडले गेले नाहीत.
पक्षाच्या कामगिरीचा प्रचार केला गेला नाही. साडेतीन वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जी विकासकामे केली, ते गुजरात निवडणुकीत मांडण्यात आले नाही. झालेली आणि भविष्यात होणारी विकासकामे मतदारांसमोर मांडण्यात आली नाहीत. भावनिक मुद्द्यांवर निवडणूक झाली. त्यामुळे ॲन्टी इंकम्बन्सीचे वातावरण तयार झाले आहे.