Breaking News

बेटी बचाव कार्यक्रमाअंतर्गत जालना ते नगर पायी यात्रेचे आगमन



सोनई/प्रतिनिधी/:- भारतभर शासनाच्या वतीने” बेटी बचाव- बेटी पढाव” या कार्यक्रमा अंतर्गत जालना ते नगर पायी यात्रेचे शनी शिंगणापूर मध्ये आगमन झाले .त्याचे स्वागत सरपंच बाळासाहेब बानकर, माजी सरपंच राजेंद्र बोरुडे, पत्रकार विजय खंडागळे, यांनी स्वागत करून या उपक्रमाचे स्वागत केले. राष्ट्रीय युवा योजना (दिल्ली) जालना येथील सदस्य ऋषी ताडेपकर यांच्या मार्गदर्शनाखाली” बेटी बचाव” या कार्यक्रमाच्या उपक्रमात 20 हुन अधिक तरुण या पायी पदयात्रेत सहभागी होते.

अमूल सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स विजेती अंजली गायकवाड हिच्या निवासस्थानी प्रसार माध्यमाचे 28 रोजी आयोजन केले आहे. त्यात राष्ट्रीय युवा योजनेच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आलेले असल्याने “बेटी बचाव -बेटी पढाव” हया संदेशातून झी टीव्ही वाहिनीला मुलाखत देणार आहे त्यांच्या सोबत माधवराव गव्हाणे विद्यार्थी परिषदेचे डॉक्टर संतोष साळवे व महानगर न्युज चे संग्राम पोटे, विनायक चव्हाण, प्रभाकर रंदवे हे आहे.

या अगोदर त्यांनी जालना ते दिल्ली असा पायी प्रवास करण्यात आला. बेटी बचाव योजनेचा देशभरातून नावलौकिक पणा व कौतुक केले गेले आहे.या उपक्रमास गायिका क्षणमुख प्रिया, युदिनी चक्रवर्ती, प्रिया विश्वास, अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड हे सपोर्ट करतील . या सदस्यांनी शनी शिंगणापूर येथे रक्त दान ही केले. या उपक्रमास ग्रामस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला