Breaking News

ट्रिपल तलाकवर राजकारण नको - शायरा बानो

पुणे, दि. 01, नोव्हेंबर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ट्रिपल तलाक विरोधातील कायदा लवकर तयार करण्यात यावा. या कायद्याच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान कुणीही  राजकारण करु नये, असे मत तिहेरी तलाक पद्धती विरोधातील याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष  डॉ. शमसुद्दीन तांबोळी, बानो यांचे बंधू अर्शद अली, शकील अहमद हेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणानंतर आलेले विदारक अनुभव सांगितले.  न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी त्यांच्यावर दबाव टाकला. त्यांना भेटून, फोन करून अनेकदा याचिका मागे घेण्यासाठी धमकी दिली. मात्र तरीही  निर्णय कायम ठेवल्याने माझ्या बाजूने निकाल लागल्याचे त्या म्हणाल्या. आजही अनेक मुस्लिम महिलांना हलाला, बहुपत्नीत्व, तलाक यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  या सर्व महिलांनी याविरोधात आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी केले.