Breaking News

गोंधळ करणारे एमआयएमचे तीन नगरसेवक कायम निलंबित

औरंगाबाद, दि. 17, ऑक्टोबर - महापालिकेच्या सर्वसधारण सभेत पाण्याच्या प्रश्‍नावरून सभागृहात खुर्च्या भिरकाणार्या एमआयएच्या तीन नगरसेवकांनी गोंधळ घालत चक्क  महापौरांच्या दिशेने खुर्च्या फेकल्या. त्यातल्या दोन खुच्या महापौरांना लागल्या. या प्रकरणात गोंधळ घालणार्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांचे सदस्यत्व कायमचे रद्द करण्यात  आले आहे. 
औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर भगवान घडमोडे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांची शेवटची सर्वसाधारण सभा होती. शहरातील पाणी प्रश्‍नावर सर्वपक्षीय नगरसेवक जाब विचारत  असताना. नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात आली. जेवढी वसुली होते त्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्हावा असे या वेळी शिवसेने कडून सूचित करण्यात आले. मात्र  त्यावर एम आयआम कडून आक्षेप घेण्यात आला. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. एमआयएम नगरसेवक राजदंड पळवण्यासाठी पुढे आल्याने सुरक्षारक्षक पुढे सरसावले. त्यावेळी  एमआयएम नगरसेवक सय्यद मातीन आणि जफर बिल्डर यांनी त्यांना पाठीमागे लोडत खुर्च्या फेकल्या. झटपट सूरु असताना महापौर आसन सोडून सुरक्षा रक्षकाकडे गेले असता फे कलेली खुर्ची त्याच्या अंगावर पडली. या गोंधळानंतर कठोर कारवाई करत एमआयएमचे नगरसेवक जफर बिल्डर आणि सययद मातीन यांचे नगरसेवकपद कायमसाठी रद्द करण्यात  आले आहे. यापूर्वीही वंदेमातरम वरून पालिकेत जो राडा झाला होता. त्यामध्ये हे दोन्ही नगरसेवक आघाडीवर होते. त्यावेळी सभागृहाची तोडफोड केल्यामुळे एक दिवसासाठी त्यांचे  सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. आजही अखेर महापौरांना सभागृहात पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.
भाजपच्या महापौरांचा कार्यकाळ संपत आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील ताणलेले राजकीय संबंध पाहता आता शिवसेनेला महापौरपद देण्यास भाजपच्या नेत्यांची  तयारी नाही. त्या पार्श्‍वभूमीवर एमआयएम सोबत मनपात दाखविलेला संघर्ष हा केवळ दिखावू स्वरूपाचा आहे काय अशी चर्चा सुरू झाली आहे.