Breaking News

जनावरे चारताना वीज पडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद, दि. 17, ऑक्टोबर -  परतीच्या पावसात वीजेचे तांडव सुरू असून वीज पडून मरण पावल्याच्या घटना मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काल रविवारी  वाळूज परिसरात सायंकाळी जनावरे चारत असताना वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कैलास रावसाहेब अरगळे, (वय-31) रा. अरगळे वस्ती, वाळूज हह या भागात  गुरे चारण्यासाठी गेला असता दुपारी जोराचा पाऊस व विजा चमकणे सुरू झाले. अडोशासाठी कैलास एक झाडाखाली थांबला असता नेमके तेथेच वीज पडली. त्यामुळे तो गंभीर  जखमी झाला. त्याला तातडीने घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी घाटी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार चालू असताना सकाळी मृत्यू झाला. वाळूज पोलिस  ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.