Breaking News

एकात्मतेत मोठी शक्ती, जलयुक्तचे यश एकतेत - जिल्हाधिकारी

सातारा, दि. 31, ऑक्टोबर - एकता काय करु शकते, किती प्रचंड ताकद एकतेमध्ये असते याचे उत्तम उदाहरण सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानात अनेक गावांनी  लोक सहभागातून नू भूतो ना भविष्यती अशी जलसंधारणाची कामे केली. अशीच एकता देश उभारणीसाठी गरजेची आहे, आज वल्लभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधींच्या स्मरण  दिनाच्या निमित्ताने आपण एकता दौड करुन जिल्ह्याच्या विकासासाठी हा एकतेचा संकल्प करु, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, लाच लुचपतप्रतिबंध विभाग आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने ’रन फॉर युनिटी’ अर्थात  एकता दौड आयोजित करण्यात आली. सुरुवातीला येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीवर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्यासह उपस्थितांनी फुले वाहून अभिवादन के ले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. यानंतर यशवंत गायकवाड यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.
एकतेच्या जोरावर कोणतीही मोठी अडचणी आपण दूर करु शकतो. आज सातारा जिल्ह्यात एकतेच्या जोरावर दुष्काळी भागात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चांगली कामे झाली  आहेत. गावातील लोकांनी आपले मतभेद विसरुन एकजुटाने श्रमदानातून जलसंधारणाची चांगली कामे करुन आज ही दुष्काळी पट्टयातील गावे पाणी दार केली आहेत. हे शक्य झाले  ते एकजुटीमुळे. नैसर्गिक आपत्तीलाही एकतेतुन मात करु शकतो हे यातून सिद्ध झाले आहे. एकतेमध्ये मोठी ताकद आहे. एकतेच्या जोरावर स्वत:चा, जिल्ह्याचा, राज्याचा व देशाचा  विकास करावा. सरदार वल्लभाई पटेल यांना पोलादी पुरुष व स्व. इंदिरा गांधी यांना पोलादी स्त्री म्हणून त्यांची आपण आठवण काढतो. भारत एक संघ ठेवण्यासाठी या दोघांची भू मिका महत्वाची आहे. त्यांच्या स्वप्नातील विकसीत भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.