Breaking News

एस. टी. कर्मचा-यांचे पगार कापण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध

औरंगाबाद, दि. 01, नोव्हेंबर - ऐन दिवाळीत पगारवाढ व सातवा वेतन आयोग आदी मागण्यांसाठी संप करणा-या कर्मचा-यांचा 36 दिवसांचा पगार नुकसान भरपाईपोटी क ापण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. 2600 पैकी संपात सहभागी 1900 कर्मचा-यांचा पगार कापला जाणार असून येथून पुढे प्रत्येक महिन्यामध्ये चार दिवसाचा पगार  कापला जाणार आहे. या निर्णयाला औरंगाबादमधील एसटी कर्मचा-यांनी तीव्र विरोध करत संताप व्यक्त केला आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या संपात चार दिवसात एकही एसटी  स्थानकाबाहेर पडली नव्हती. हा संप बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने संप मागे घेण्याचे आदेश दिले होते.