Breaking News

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मराठवाडयात पंचाऐंशी टक्के मतदान

औरंगाबाद, दि. 08, ऑक्टोबर - ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मराठवाडयात पंचाऐंशी टक्के असे भरघोस मतदान झाले आहे.यंदा सरपंच थेट जनतेतून निवडण्यात  येत असून सरपंचाला राजकीय पक्षाचे चिन्ह वापरता येणार नव्हते तर गावागावत वेगवेगळे नाव देवून पँनल स्थापन करण्यात आले होते.मराठवाडयात शांततापुर्ण  वातावरणात मतदान झाले असून सायंकाळी पाच पर्यंत पंचाऐंशी टक्के मतदान झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.