अंबरनाथमध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
अंबरनाथ, दि. 24, ऑक्टोबर - अंबरनाथच्या कानसई गाव परिसरातील तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या करुन आमहत्या केल्याची घटना घडली. आचल महल्ले (20) असे मृत तरुणीचे नाव असून ती दिवा येथे राहणारी आहे. तर, नत्राम वर्मा (25) असे प्रियकराचे नाव आहे.
आचल हिचे नत्राम या विवाहीत तरुणाशी प्रेमसंबंध होते. ती दिवाळीत त्याच्या घरी राहण्यास आली होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले व रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
तरुणीचा मृतदेह कुजलेला असल्यामुळे तिची हत्या तीन दिवसांपूर्वी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी रात्री नत्रामने स्वतः तरुणीच्या कुटुंबियांना फोन करून मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि मग स्वतः आत्महत्या केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आचल हिचे नत्राम या विवाहीत तरुणाशी प्रेमसंबंध होते. ती दिवाळीत त्याच्या घरी राहण्यास आली होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले व रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
तरुणीचा मृतदेह कुजलेला असल्यामुळे तिची हत्या तीन दिवसांपूर्वी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी रात्री नत्रामने स्वतः तरुणीच्या कुटुंबियांना फोन करून मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि मग स्वतः आत्महत्या केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.