Breaking News

शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत गोंधळ असल्याच्या तक्रारी

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत गोंधळ होत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहेत. या तक्रारींचे राज्य सरक ारकडून त्वरेने निराकरण न झाल्यास शेतकर्‍यांमध्ये सरकारबद्दल असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
18 ऑक्टोबर रोजी दिवाळीमध्ये राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली . त्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कार्यक्रमाचे आयोजन क रण्यात आले होते . या कार्यक्रमात काही शेतकर्‍यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या दिवशी संपूर्ण राज्यभरात त्या त्या जिल्ह्याच्या  मुख्यालयात कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकर्‍यांना दिल्या गेलेल्या कर्जमाफीच्या प्रमाणपत्रावरील रक्क मच गायब असल्याचे दिसून आले . ज्या शेतकर्‍यांना रकमेचा उल्लेख नसलेली प्रमाणपत्रे देण्यात आली होती त्यांनी कार्यक्रम चालू असतानाच ही गोष्ट संबंधितांच्या लक्षात आणून  दिली . त्यावेळी कार्यक्रमात काही वेळ गोंधळही झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या निदर्शनास हा प्रकार  आल्यानंतर त्यांनी तातडीने रकमेचा उल्लेख असलेली प्रमाणपत्रे वितरीत करावयास लावली . प्रशासनाचा हा निष्काळजीपणा शेतकर्‍यांच्या संतापास कारणीभूत ठरला .
असाच काहीसा प्रकार उस्मानाबाद येथे झाल्याचे दिसून येते आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत तांबे या शेतकर्‍याच्या नावावर एक लाख 40 हजार रु. चे कर्ज आहे . कर्जमाफी  प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमावेळी त्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात 10 हजारांचेच कर्ज माफ झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे . याबद्दल तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना पत्र पाठवून संताप व्यक्त केला आहे.