कल्याणमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती चोरली
ठाणे, दि. 27, ऑक्टोबर - कल्याणमधील सिद्धार्थनगर येथील लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाजवळ असलेल्या तथागत गौतम बुद्धांची पितळेची मूर्ती चोरला गेली आहे. गौतम बुद्धांची 3 फुट उंच आणि जवळपास 20 किलो वजनाची 40 हजार रुपये किमतीची पितळेची होती. मूर्ती चोरीला गेल्याची बाब आज सकाळी स्थानिक बौद्ध बांधवांच्या लक्षात आली.
या प्रकरणामुळे बौध्द समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच तमाम बौध्द बांधवांनी दिला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे बौध्द समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच तमाम बौध्द बांधवांनी दिला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.